इंग्रजांची राजवट | British rule Information in Marathi 2025
पेशवाईच्या अस्तानंतर कंपनीच्या राजवटीत महाराष्ट्र हा विशाल मुंबई राज्याचा एक भाग बनला. माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा काही काळ मुंबई राज्यात आयुक्त होता. नंतर तो मुंबईचा गव्हर्नर बनला. याच्या काळात कोळी-रामोश्यांच्या मदतीने उमाजी नाइकाने उठान केला. हा उठाव एल्फिन्स्टनने इ.स. १८३४ मध्ये मोडून काढला.
याच काळात महाराष्ट्राची खानदेश, पुणे, अहमदनगर यांसारख्या मोठ्या जिल्ह्यांत विभागणी करण्यात आली व जिल्हाधिकारी, मामलेदार, शिरस्तेदार, पोलीस पाटील, कुलकर्णी, तलाठी अशी संरचना तयार झाली. एल्फिन्स्टन नंतर जॉन माल्कम, रॉबर्ट ग्रेट यांसारखे अनेक कर्तबगार गव्हर्नर महाराष्ट्राला लाभले. माल्कमच्या काळात महाबलेश्वर येथे ‘माल्कम पेठ’ बसली गेली, माल्कमच्याच काळात मुंबई-पुण्याला जोडणारा बोरघाट बांधला गेला.
१८६० च्या दशकातील महत्त्वपूर्ण घडामोडी
इ. स. १८५७ चा उठाव उत्तर महाराष्ट्रापुरता मर्यादित असला तरी नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई इत्यादी मराठी मंडळी या उठावाच्या मागी राहिली. महाराष्ट्रात कोल्हापूरच्या महाराजांचे धाकटे बंधू विमासाहेब, सखेडचे रंगराव पारी, वैजापूरचे गोविंदराव देशपांडे, सातारचे रंगो बापूची गुप्ते इत्यादी मंडळी या उठावात सहभागी झाली होती.
इ. स. १८५८ मध्ये व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला व भारतावर आणि पर्यायाने महाराष्ट्र राज्यासाः कृलंडच्या राजाची प्रत्यक्ष सत्ता प्रस्थापित झाली. इ. स. १८५७ च्या युद्धापूर्वीच्या चार-पाच वर्षात काही उल्लेखनीय गोष्टी घडून आल्या. इ. स. १८५३ मध्ये ‘मुंबई ते ठाणे’ हा पहिला लोहमार्ग तयार केला गेला व मुंबई ते ठाणे आगगाडी धावू लागली.
इ. स. १८५५ मध्ये मुंबई इलाख्यात ‘शिक्षण खात्याची’ स्थापना झाली; तर १८५७ मध्ये ‘मुंबई विद्यापीठाची स्थापना केली गेली. त्यानंतरच्या काळात मुई इलाख्याला लाभलेल्या अनेक गव्हर्नमध्ये रिचर्ड टेंपल ने सन विल्लान इत्यादीचा विचार करणे आवश्यक आहे. टेंपल फर्गसन व विल्सन यांच्या काळात मुंबई इलाख्यात अनेक शैक्षणिक सुधारणा घडून आल्या.
वृत्तपत्रे व शैक्षणिक संस्थांचा जन्म
इ. नं. १८५८ नंतरच्या इंदु (१८६२), फुल्यांच्या प्रेरणेने चालू झालेले दीनबंधू (१८७७), विष्णूशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला (१८७४) रिकांचे केसरी मराठा (१८८१), आगरकरांचे सुधारक (१८८८), शिवरामपंत पक्यांचा काळ (१८१८) अच्युत्कारांचा संदेश (१९९८) यांसारखी वृत्तपत्रे सुरू झाली. इ.स. १८६० मध्ये वामन प्रभाकर भाये बानी पूरा नेटिक इनिटट्यूशन असोसिएशन (सध्याची महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी) या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली.
१ जानेवारी, २८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी टिळक, आगरकरांच्या मदतीने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. इ. स. १८७८ नंतरची काही वर्षे वासुदेव बळवंत “आद्य क्रांतिकारक ठरले.
स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता महाराष्ट्र
यानंतरचा कालखंड हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा कालखंड होय. या कालखंडातील महत्वाची घटना म्हणजे २८ डिसेंबर, १८८५ रोजी मुंबई येथे झालेली राष्ट्रसभेची स्थापना ही होय. इ.स. १८८५-१९०५ हा कालखंड राष्ट्रसभेचे ‘पहिले पर्व’ म्हणून ओळखला जातो, या काळात राष्ट्रसभेची सूत्रे दादाभाई नौरोजी, न्या. रानडे, न्या. तेलंग, फिरोजशहा मेहता व गोपाळ कृष्ण गोखले यासारख्या नेमस्त किंवा मवाळ नेतृत्वाकडे होती.
या काळात २२ जून १८९७ रोजी चापेकर बंधूनी बैंड या जुलमी अधिकान्याचा व लेष्टनंट आर्टचा पुणे येथे गणेश खिंडीत वध केल्ला. चापेकर बंधुंना फाशीची शिक्षा झाली
१ जानेवारी १९०० रोजी स्वातंत्यावीर सावरकरांनी नाशिक ला ‘मित्रमेळा’ ही क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. तिथेच पुढे इ. स. १९०४ मध्ये ‘अभिनव भारत’ या संघटनेत केळकर, अप्पासाहेब मुजुमदार, अनंत कान्हेरे यांसारख्या क्रांतिकारकांचा सहभाग होता.
अनंत कान्हेरे यांनी १९०९ आर्थर जॅक्सन चा वध केला, बैंकारच्या खुनाच्या आरोपावरून भरलेल्या खटल्यात सावकरांना ५० वर्षाची शिक्षा ठोठाविण्यात आली, तर अनंत कान्हेरे यांना फाशी देण्यात आली.
टिळकयुग
१६ ऑक्टोबर, १९०५ रोजी बंगालची फाळणी झाली. या फाळणीनंतर टिळकांच्या जहाल राजकारणाला वेग प्राप्त आला. इ.स. १९०५-१९२० या कालखंडावर टिळकांच्या जहाल नेतृत्वाचाच प्रभाव होता. हा कालखंड टिळकयुग म्हणून ओळखला जातो. इ. स. १९०८ मध्ये टिळकांना राजद्रोही म्हणून सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. या कालावधीत कोल्हापूरच्या शिवाजी क्लब सारख्या क्रांतिकारकांच्या आंगवी काही संघटना निर्माण झाल्या.
याच सुमारास सोलापूर शहरात ब्रिटिश शासनाने अनन्वित अत्याधार केले व तेथील मल्लाप्पा धनशेट्टी, कुर्बान सुन असा काही देशभक्तांना फाशी दिले. याचा सूड म्हणून पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधील बासुदेव बळवंत गोगटे या विद्याम्यने २२ जुलै, १९३१ रोजी फर्ग्युसन महाविद्यालयातील ग्रंथालयामध्ये तत्कालीन हंगामी गव्हर्नर सर अर्नेस्ट हॉटसनवर गोळ्या झाडल्या.
हॉटसन याच्यावर केलेल्या या प्राणघातक हल्ल्याबद्दल गोगटे यांना १२ वर्षांची श्रमिक कारावासाची शिक्षा ठोठावली गेली; मात्र, मुदत संपण्यापूर्वीच १९३७ च्या सप्टेंबरमध्ये त्यांची मुक्तता करण्यात आली.
गांधीयुग
इ. स. १९२० मध्ये टिळकांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय सभेची व स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे गांधीच्या हाती आली. इ. स. १९२० बी असहफसाची चळवळ, १९३० चे सविनय कायदेभंगाचे आंदोलन, १९४० चे वैयक्तिक सत्याग्रहाचे सत्र नं. १९४२ थी ‘बले नावची बळ हे मोठे लदे गांधीजीच्या नेतृत्वाखाली लढले गेले.
या कालखंडास भारतीय स्वातंत्र्यलयाच्या इतिहासात ‘गांधीयुग’ म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे ८ ऑगस्ट, १९४२ चा ‘चले जाव’चा ठराव मुंबई येथील गवालिया टैंक मैदानात भरलेल्या राष्ट्रसभेच्या बैठकीत संमत झाला.
संयुक्त महाराष्ट्राची मागणी
२८ जानेवारी, १९४० रोजी मुंबई येथे रारा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ‘संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली. (२) इ. स. १९४६ मधील बेळगाव येथील मराठी साहित्य संमेलनात उग्रचार्य अत्रे व.ग. त्र्यं. माडखोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्राची मागणी केली. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र आला. इ. स. १९४६ पासून मुंबई राज्याच्या मुख्यमंत्रिपदी असलेले बाळ गंगाधर खेर हेच स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले.
सरदार पटेलांची ऐतिहासिक कामगिरी
भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मुत्सद्दे गिरीस यश येऊन तत्कालीन अनेक संस्थाने भारतात विलीन झाली; परंतु हैदराबादच्या निजामाच्या भूमिकेमुळे मात्र भारत सरकारला १३ सप्टेंबर, १९४८ रोजी आपले लष्कर हैदराबादमध्ये घुसविणे भाग पडले. हैदराबाद मुक्तीसाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी चालविलेल्या आंदोलनाचा व जनतेच्या उठावाचा अनुकूल परिणाम होऊन चार दिवसांच्या आत हैदराबाद संस्थानातील भारत विरोधी व जनते विरोधी रझाकारी आंदोलना चा बीमोड केला गेला.
१७ सप्टेंबर, १९४८ रोजी निजामाने भारतीय सेनेपुढे शरणागती पत्करली. १८ सप्टेंबर, १९४८ रोजी निजामाने सामील नाम्यावर सही करून भारतातील विलीनीकरणास मान्यता दिली.
Also Read









